Friday, December 24, 2010

आहार

ॐ                   आहार                                           २४-१२-२०१०
सगळीकडेच खूप मस्त थंडी पडलीय़ॆ. अशा थंडीत साहजिकपणेच काही तरी स्पाईसी खावंसं वाटतं, नाही का? स्पाईसी खायचं म्हणजे त्यात स्पाईसेस असणारचं आणि स्पाईसेस म्हणजे आपले मसाल्याचे पदार्थ जे भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग असतात. अगदी भाजीच्या फ़ोडणीपासून ह्या मसाल्यांच्या वापराची सुरुवात होते. साधी आपली मोहरी, हळद आणि हिंग हे फ़ोडणीचे तीन बेसिक घटक मसाल्याच्याच पदार्थातले आहेत आणि मसाले म्हणजे तिखट, चटपटीत, जेवणाला चव देणारे अशी आपल्याला त्यांची साधारण ओळख असते पण आयुर्वेद ह्या पदार्थांचे औषधी गुणधर्म सांगतो. वास्तविक त्यांचा रोजच्या जेवणात वापर करण्यामागे महत्त्वाची संकल्पना अशी असावी की रोजच्या रोज थोड्याशा प्रमाणात त्यांचे गुण जेवणातून पोटात जावेत. सगळ्याच मसाल्याच्या पदार्थांचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ते ज्या पदार्थात घातले जातात त्याची चव वाढवतात. मसाल्याच्या पदार्थांचा दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे ते काही प्रमाणात अन्नपचनालाही मदत करतात. पण जवळ जवळ सगळेच मसाल्याचे पदार्थ हे गरम-ऊष्ण, तिखट असतात, त्यामुळे ज्यांना पित्ताचा त्रास असतो किंवा इतरांनीही ते जपूनच वापरले पाहिजेत आणि खरं सांगायचं तर कुठल्याही पदार्थात प्रमाणापेक्शा जास्त मसाले पडले तर त्याची चवच बिघडते. आता स्पाईसेस यादीतल्या नेहमीची मंडळींची ही थोडी ओळख- मोहरी-सरसों(मस्टर्ड), हळद(टर्मरिक), हिंग(असॆफ़ोटीडा) हे प्रत्येक फ़ोडणीचा बेस ह्याशिवाय तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरी, जावित्री, आलं,लसूण,ओवा,वेलची-छोटी आणि मोठी, जावित्री, जायफ़ळ, मिरची इ.
हे सगळे जरी मसाल्याचे पदार्थ ह्या कॅटेगरीत मोडणारे असले तरी प्रत्येकाची स्वत:ची वेगळी प्रॉपर्टी आहे.
हळद, सगळ्यात बेस्ट ब्लड प्युरीफ़ायर. भारतात लग्नाच्या आदल्या दिवशी वधू-वरांना हळद लावण्याची प्रथा आहे.  हळद जशी इंटर्नली घेता येते तशी ती एक्सर्टनली सुद्धा वापरता येते. ब्लड प्युरिफ़ायर असल्यामुळे ती त्वचेचा रंग उजळण्याचं काम करते. हळदीची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती अ‍ॅटीसेप्टीकचं कामही खूप मस्त करते आणि जखमेतलं रक्त थांबविण्याचं कामही करते. त्यामुळे कुठेही खरचटलं किंवा छोटीशी जखम झाली आणि रक्त यायला लागलं की पहिली हळद त्यावर लावली जायची. त्यामुळे रक्त थांबायचं, जखम भरायची आणि कुठलंही इन्फ़ेक्शन देखील होत नसे. हिंग हा गॅसेस वर सगळ्यात चांगला समजला जातो. पूर्वी लहान मुलांना गॅस होऊन पोट जर फ़ुगलं तर पाण्यात हिंग मिक्स करून तो पोटावर लावला जायचा. अगदी मोठ्या माणसांनाही गॅसेस झाले तर ते जेवणाच्या शेवटी ताकाबरोबर हिंग घ्यायचे. गॅसेसमुळे होणार्या पोटदुखीवर ओवा सगळ्यात बेस्ट औषध. हे सगळे मसाल्याचे पदार्थ म्हणजे हळद, मोहरी इ. ड्राय़ वापरले जातात. पण आलं(जिंजर), लसूण(गार्लिक) ह्यासारखे पदार्थ वेट-ओले-फ़्रेश वापरले जातात. हळद कधी कधी ओलीही वापरली जाते पण त्याचं लोणचं इ. करून. आलं हे पचन-डायजेशन अतिशय चांगलं करणार आहे आणि हेच आलं सुकवून त्याच्यापासून जी सुंठ बनवली जाते ती तर अनेक रोगांवर रामबाण इलाज. म्हणजे जर आलं मिळाल नाही तरी सुंठीचा पर्याय कधीही मिळू शकणारा. 
महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या मसाल्याच्या पदार्थांची झाड असतात. ह्यातलं आलं, हळद आणि लसूण हे पदार्थ जमिनीखाली मिळतात. थंडीच्या दिवसात लसूण तिच्या पानांसकट मिळते, पातीच्या कांद्यासारखी. काळीमिरी वेलावर लागते. तमालपत्र म्हणजे एका विशिष्ट झाडाची पानं-लिव्हज, दालचिनी म्हणजे त्याच झाडाची साल-बार्क.वेलची अगदी छोट्याशा झाडावर लागते. जायफ़ळ मोठ्या झाडाला लागतं आणि  जायफ़ळावर जी साल असते तिला जावित्री म्हणतात, तर लवंग म्हणजे  झाडाची कळी-बड, हिंग म्हणजे  झाडाच्या स्टेममधून बाहेर पडणारा एक प्रकारचा गोंद-रेझीन. मोहरीची झाडंही छॊटी असतात. सरसों नावाचा मोहरीसारखाच पदार्थ असतो आणि ह्या सरसोंच्या पानांची भाजी केली जाते त्याला  सरसों का साग म्हणतात. 
आता शेवटी थोडं महत्त्वाचं. ह्या थंडीच्या सीझनमध्ये वातावरणात खूप ड्रायनेस असतो त्यामुळे ह्या काळात शरीरातला ड्रायनेस वाढविणारे पदार्थ खाऊ नयेत. आहारातली कडधान्य शरीरात ड्रायनेस वाढवतात, म्हणून त्यांचा वापर टाळावा. "श्रीवर्धमान व्रताधिराज”च्या नऊ अंगांपैकी एक अंग आहारासंबंधी आहे आणि त्यात आहाराबद्दल विशेषरूपाने सांगण्यात आलेलं आहे. ह्या सीझनमध्ये तिळाचं तेल सगळ्यात बेस्ट- खाण्यासाठी आणि शरीरावर लावण्यासाठीही. आज आपण अनेक प्रकारची तेल वापरतो पण आयुर्वेदात वर्णन येतं की जे तिळापासून काढलं जातं त्यालाचं "तेल’’-ऑईल म्हणतात. तिळाच तेल सगळ्या प्रकारच्या तेलांमध्ये स्निग्ध आहे. थंडीतल्या ड्रायनेसवर सगळ्यात चांगला उपाय. "श्रीवर्धमान व्रताधिराज”चं एक अंग तिळाच्या तेलाच्या वापराविषयी आहे. अर्थात उपासना हे ह्या व्रताचं अविभाज्य अंग आहे. त्यामुळे "श्रीवर्धमान व्रताधिराज” म्हणजे माणसांच्या मेंटल आणि फ़िजिकल दोन्ही प्रकारच्या हेल्थची सर्वोत्तम काळजी घेणारं. 
सो, आजसाठी एवढंच. आता बहुतेक आपली भेट न्यू इयरमध्येच. सो, हॅपी न्यू इयर टू ऑल इन अ‍ॅडवान्स.