Friday, September 23, 2011

सहोपासना

।। ॐ ।।

सहोपासना



आपणा सर्वांना ठाऊकच आहे की विश्वकल्याणाच्या उदात्त उद्देशाने परमपूज्य सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापु आश्विन शुक्ल प्रतिपदा- घटस्थापना- बुधवार 28 सप्टेंबर2011- अशुभनाशिनी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून 2012च्या  चैत्र शुक्ल नवमीपर्यंत- शुभंकरा नवरात्रीच्या नवमीपर्यंत- रामनवमीपर्यंत ’घोर तपश्चर्या' करणार आहेत. परमपूज्य बापुंच्या कृपेने आम्हां श्रद्धावानांना ’श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम्‌'मध्ये ’सहोपासना' आणि ’मातृवात्सल्यविन्दानम्‌' पठण करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.  सहोपासनेमध्ये खालील 7 उपासनांचा समावेश आहे.

1) दत्तमंगलचण्डिका स्तोत्र- 108 वेळा
2) आदिमाता शुभंकरा स्तवन- 108 वेळा
3) आदिमाता अशुभनाशिनी स्तवन- 108 वेळा
4) सनातनदेवीसूक्त- 54 वेळा
5) दत्तबावनी- 52 वेळा
6) महिषासुरमर्दिनी आरती (जपाच्या स्वरूपात)- 54 वेळा
7) अनसूया मातेची आरती (जपाच्या स्वरूपात )- 108 वेळा

Saturday, September 10, 2011

बापूंची घोर तपश्चर्या



सप्टेंबर २०११
बापूंची घोर तपश्चर्या
लहानपणी आजी गोष्ट सांगायची. तिच्या गोष्टीत हमखास कोणी तरी तपश्चर्या केल्याचा उल्लेख असायचा. तेव्हापासून तपश्चर्या ह्या शब्दाशी ओळख झाली. पुढे शाळेत असतानाही शालेय अभ्यासक्रमात कधी ना कधी तरी हा शब्द कानावर पडत होता. त्यानंतर थेट  गुरुवारी इतक्या वर्षांनंतर तपश्चर्या हा शब्द सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांच्या मुखातून ऐकला. गुरुवारी सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी श्रीहरिगुरुग्राम येथे सांगितले की ते स्वत: येत्या आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून म्हणजेच अशुभनाशिनी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते रामनवमीपर्यंत म्हणजे शुभंकरा नवरात्रीच्या नवव्या दिवसापर्यंत तपश्चर्या आणि तीही घोर तपश्चर्या करणार आहेत.
सद्‍गुरुंना स्वत:ला तपश्चर्या करण्याची गरज का भासावी याचं उत्तर बापूंनी स्वत:च त्यांच्या गुरुवारच्या प्रवचनात दिलं. त्यानुसार श्रद्धावानांची उपासना व्यवस्थित होत नाही, गुरुमंत्र मिळूनही श्रद्धावानांच्या मनात अनेक तर्क-कुतर्क आहेत, त्यामुळे त्यांना ह्या गुरुमंत्राचं फ़ळ प्राप्त होत नाही. ह्या सगळ्यावर उपाय म्हणून बापूंनी स्वत: घोर तपश्चर्या करण्याचे ठरविले आहे.
आयुर्वेदात एक महत्त्वाचा सिद्धांत प्रतिपादित केलेला आहे. प्रत्येक युगात मानवाचे आयुष्य आणि त्याचबरोबरीने त्याच्यातील सत्त्व गुण घटत जातो, कमी होत जातो. सत्ययुगात मानवाचे आयुष्य 400 वर्षांचे होते आणि सत्त्वगुण भरपूर होता. कलियुगात माणसाचे आयुष्य फ़क्त 100 वर्षांचे आहे आणि माणसातला सत्त्वगुण अतिशय कमी झालेला आहे. त्याच वेळेस माणसातले रज आणि तम ह्या गुणांचे प्रमाण खूपच वाढले आहे. रजोगुण हा चंचलता निर्माण करणारा तर तमोगुण आवरण करणारा आहे.
गुरुक्षेत्रम्‌ मंत्रावर, गुरुक्षेत्रम्‌वर आणि बापूंवर प्रेम करणा-या श्रद्धावानांच्या जास्तीत जास्त चुका कमी करून, त्यांच्यावर कर्जाच्या राशी जमू नयेत आणि त्याला जास्तीत जास्त क्षमा मिळावी म्हणून बापू स्वत: तपश्चर्या करणार आहेत.
आपल्या भारतभूमीत तपश्चर्येचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. इतकं की परमात्मा जेव्हा राम, परशुराम ह्या नावाने मनुष्य रूपात अवतीर्ण झाला तेव्हा त्यांनीही तपश्चर्या केली होती.
आज प्रत्येक सच्च्या श्रद्धावानाचे प्रयास स्वत:चे दैनंदिन जीवन जगताना कुठेतरी कमी पडतात आणि ते त्यांना स्वत:ला जाणवतंही. म्हणूनच बापू पुढे असंही म्हणाले की या तपश्चर्येदरम्यान प्रत्येक श्रद्धावानाने स्वत:ला दूषणं देणे, स्वत:ला कमी लेखणे, स्वत:ला पापी समजणे पूर्णपणे थांबवावे आणि जास्तीत जास्त वेळ भक्ती व उपासनेत घालवावा.
आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा- बापूंच्या ह्या तपश्चर्येचं फलित म्हणजे सर्वांग ब्रह्मास्त्र व सर्वांग करुणाश्रय. ब्रह्मास्त्र जे वाईट आणि चुकीचे आहे त्याचा नाश करणारे आहे; तर जो बापूंवर आणि भारतावर प्रेम करतो, त्याच्यासाठी करुणाश्रय आहे आणि ह्याची स्थापना बापू गुरुक्षेत्रम्‌ येथे करणार आहेत.

Wednesday, July 6, 2011

आजीचा बटवा

                  

६-७-२०११
आजीचा बटवा
पूर्वीच्या काळी घराघरात हा आजीचा बटवा असायचा. आज काळाच्या ओघात हा आजीचा बटवा कुठल्या कुठे हरवला की काय असं वाटायला लागलं.
आजीचा बटवा- काही जणांना ही संकल्पना माहीतही असेल. आजीचा बटवा म्हणजे नेमकं कायं? पूर्वी घराघरात असलेल्या आज्यांकडे कुठल्याही किरकोळ-मायनर आजारावर घरातच असलेली अनेक औषध तयार असायची आणि ह्या सगळ्या औषधांचाच मिळून तयार व्हायचा आजीचा बटवा.
पाय मुरगळला लाव हळद आणि फ़टकी (तुरटी-अ‍ॅलम)चा लेप, कुठेही कापलं तर ताबडतोब त्यावर हळद चेपली जायची, घसा दुखत असेल तर डायरेक्ट अ‍ॅंटीबायोटीक्स न घेता गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या (गार्गलिंग) केल्या जायच्या. सर्दीवर पहिला उपाय असायचा सुंठ नाहीतर वेखंड उगाळून लावायचा. पोटात गॅसेस झाले असतील तर ओवा नाहीतर हिंगाचा वापर केला जायचा.
लहान मूल रात्री रडायला लागलं आणि त्याच्या पोटात गॅस झाल्याचा अंदाज आला तर थोडासा हिंग पाण्यात मिक्स करून तो पोटावर लावला जायचा.
ह्या आजीच्या बटव्यात रक्तचंदनाची बाहुली, चंदनाचं खोड, हळकुंड, सागरगोटा, मुरुडशेंग, तुरटी, वेखंड, सुंठ अशी अनेक औषधं असायची. ही सगळी औषध तसं बघायला गेलं तर अगदी सहज मिळणारी असायची, नाही तर घरात असायचीचं, त्यामुळे छॊट्या छोट्या आजारांवर सगळ्यात आधी ह्याच औषधांचा वापर केला जायचा. 

शरीरावर एखाद्या ठिकाणी आग-बर्निंग होत असेल तर त्यावर तूप लावलं जायचं. तुपाच्या थंडाव्यामुळे त्या जागेची आग कमी व्हायची. आयुर्वेदात ह्या तूपापासून तयार केलं जाणारं एक वैशिष्ट्यपूर्ण औषध आहे. शतधौत असं त्या तुपाला म्हटलं जातं कारण हे औषध तयार करताना खरोखरचं तूप शंभर वेळा पाण्याने धुतात. ह्यामुळे तूप अतिशय सॉफ़्ट होतं आणि अतिशय थंडही. त्यामुळे शरीराच्या कुठल्याही अवयवाचा दाह-बर्निंग होत असेल तर हे उत्तम औषध.
आवळा-ज्याला आयुर्वेदात आमलकी म्हणून नाव दिलेलं आहे. हा आवळा व्हिटॅमिन सी चा सगळ्यात मोठा सोर्स. ह्यातलं व्हिटॅमिन सी बराच मोठा काळपर्यंत टिकून राहतं आणि म्हणूनच आवळा ताजा(फ़्रेश) आणि वाळवून(ड्राय) दोन्ही प्रकारे वापरता येतो. ह्याला आयुर्वेद रसायन औषध म्हणतो. रसायन म्हणजे असं औषध जे वार्धक्यावस्था लवकर येऊ देत नाही- म्हणजे डीजनरेटीव चेंजेस लवकर होऊ देत नाही आणि एखाद्या आजारानंतर शरीराची प्रतिकारशक्ती वाढवितो जेणे करून लवकर आजारपण येऊ नये.
आवळ्याप्रमाणेच गुळवेल, शतावरी, हिरडा अशा अनेक औषधी रसायन म्हणून सांगितल्या आहेत आणि त्या प्रत्येकापासून तयार करण्यात येणारी अनेक औषधं आयुर्वेदात वर्णन केलेली आहेत.
आजचा जमाना पोल्युशन, ग्लोबल वॉर्मिंग अशा अनेक समस्यांचा आहे. त्यामुळे माणसांची इम्युनिटी म्हणजे रोगाचा प्रतिकार करण्याची शक्ती खूपच कमी झाली आहे. त्यामुळे माणसं वर्षात अनेक वेळा आजारी पडतात. एकाच व्यक्तीला दोनदा-तीनदा मलेरियासारखा आजार झालेला आपण आजकाल पाहतो. मग अशावेळी ह्या आयुर्वेदातल्या औषधांचा कितपत उपयोग होईल असा प्रश्न पडू शकतो. पण ह्याचं उत्तर एकच असू शकतं की जे कोणी ह्याचा वापर करून बघतात तेच ह्या प्रश्नाचं उत्तर जाणू शकतात.
आयुर्वेदाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आयुर्वेदाने निरोगी म्हणजेच रोग नसण्याची अवस्था सांगताना म्हटलं आहे की ज्याचं शरीर आणि मन दोन्ही रोगरहीत तोच खरा निरोगी. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आहार, व्यायाम अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत आणि आपण जे काही खातो त्यापासून मनालाही पोषण मिळतं आणि मनाला अधिकाधिक निरोगी म्हणजेच रोगरहीत ठेवण्यासाठी सद्‍गुरुंची भक्ती मदतीला येते. 
थोडक्यात काय ज्याचं शरीर आणि मन दोन्ही रोगरहीत तोच खरा निरोगी, नाही का?

                   

Monday, June 6, 2011

नवं कोरं

६जून२०११
 
नवं कोरं
जून महिन्याची सुरुवात. अगदी आजही जून उजाडला की शाळा कॉलेजच्या दिवसांची आठवण होते. तेव्हा जूनच्या पहिल्या आठवडयात शाळेची वह्या, पुस्तकं, कंपास, पेन, पेन्सिली असं सगळं काही खरेदी केलं जायचं. नव्या वह्यांना आणि नव्या पुस्तकांना एक मस्त वास यायचा. अजूनही जून उजाडला की तो वास आठवतो, पण आजकालच्या नव्या पुस्तकांना, नव्या वह्यांना असा वास येतो की नाही याची काही कल्पना नाही. आमच्या शाळेची सुरुवातच मुळी झाली, ती पाटी आणि पेन्सिलने. त्या पाटीवरच्या पेन्सिलला एक मस्त सुगंध यायचा. 
पाटी-पेन्सिल वापरणा-या अनेकांना कधी तरी ही पाटीवर लिहिण्याची पेन्सिल खाल्याचंही आठवत असेल. तर पाटी-पेन्सिल एक सॉलिड कॉम्बिनेशन होतं. पाटीवर लिहिलेलं नको असलं की पाण्याने नाहीतर ओल्या स्पंजने पुसायचं आणि मग थोडाच वेळ ती पाटी वाळवायची- अगदी काही सेकंदातच ती वाळायची आणि मग पुन्हा पुढे त्यावर लिहायला पाटी तयार. अगदी कोरी-जणू नवी असल्यासारखी. मी स्वत: अगदी आयुर्वेदाचा अभ्यास करताना पाटी आणि पेन्सिल वापरलेली होती. 
आता पाटी-पेन्सिलची प्रकर्षाने आठवण व्हायचं कारण म्हणजे श्रीवरदाचण्डिकाप्रसन्नोत्सव संपन्न झाल्यानंतरच्या गुरुवारी परमपूज्य बापूंनी ह्या उत्सवाचा त्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाला त्याचा काय फायदा झाला हे सांगताना पाटी-पेन्सिलचं अगदी सुंदर उदाहरण दिलं.
पाटीवर पेन्सिलने लिहिलं की ते खोडता येतं आणि काहीही खुणा (मार्क्स) न राहता परत पाटी कोरी होते आणि त्यावर हवं ते लिहिता येतं, वहीवर शिसपेन्सिलने लिहिलं की खोडायला इरेझर लागतो आणि त्यानंतर परत लिहिता येतं असलं तरी आधीचं इरेझरने खोडलेलं आहे हे कळतं आणि वहीवर पेनाने लिहिलं की बरेच वेळा खोडण्यासाठी काटच मारावी लागते. 
श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सवाने नेमकं काय दिलं, तर त्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाची पाटी कोरी करून दिली. त्यामुळे आता पुन्हा एकदा नवीन गोष्टी लिहायला प्रत्येक जण सज्ज. 
आता जाता जाता आयुर्वेदाविषयी थोडसं. जूनचा महिना म्हणजे पावसाळ्याचा महिना. आयुर्वेदाच्या भाषेत सांगायचं तर वर्षा रुतु. ह्या सीझनमध्ये नेमकं काय करायला हवं. कारण ह्यात आजारी पडण्याची शक्यता जास्त. पावसामुळे आणि पावसाळी हवेमुळे आजारी पडण्याचे चान्सेस जास्त. म्हणून पहिलं लक्ष पिण्याच्या पाण्याकडे. ह्या सीझनमध्ये निर्जंतुक पाणीच प्यायला हवं. आयुर्वेदाच्या मते ह्या सीझनमध्ये आपली पचनशक्ती थोडी कमी होते, त्यामुळे ह्या सीझनमध्ये खाण्यावरही लक्ष द्यायला हवं. जास्त स्पायसी, तेलकट गोष्टी खाण्यावर कंट्रोल ठेवायला हवा नाहीतर त्याच पुढे जाऊन त्रासदायक होतात. पण पावसाळा म्हटला की प्रत्येकाला हटकून आठवण होते ती आल्याचा चहा आणि गरमागरम भजी विशेषत: कांद्याची, खरं की नाही?

Wednesday, April 27, 2011

अनादि अनन्त आयुर्वेद

२७-०४-२०११



अनादि अनन्त आयुर्वेद

आयुर्वेद आपल्या भारतातलं सगळ्यात प्राचीन वैद्यकशास्त्र. खरं तरं आयुर्वेद हा कुणी लिहिलेला नाही. तो कसा अस्तित्वात आला, त्याविषयी आयुर्वेदात अगदी सुरुवातीलाच सांगितलं जातं. आयुर्वेद शिकणा-या स्टुडन्टसना अगदी सुरुवातीलाच ह्याची माहिती करून दिली जाते.
आयुर्वेद कुणाही मनुष्याने लिहिलेला नाही. तो जेव्हा मानवी जीवन अस्तित्वात आले, त्याच्या आधीपासूनच अस्तित्वात होता. म्हणून आयुर्वेदाला अनादि, अनंत असं म्हटलं जातं. अनादि-म्हणजे जो कधी लिहिला गेला किंवा कधी निर्माण झाला हे कोणीही सांगू शकत नाही, अनंत-म्हणजे कुठल्या एका पॉईंटला आता आयुर्वेदाचे नॉलेज संपलं असं होतच नाही. खरं तर प्रत्येक माणूस हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो. कारण ह्या जगात आपल्याला शिकण्यासाठी प्रत्येक क्षणाला काही ना काही तरी असतंच. आयुर्वेद हा ब्रह्मा, प्रजापति, अश्विनीकुमार आणि इंद्र ह्यांच्याकडून आयुर्वेदाच्या आचार्यांकडे आला आणि त्यांच्याकडून मग गुरु-शिष्य परंपरेने आयुर्वेदाचं नॉलेज इतरांपर्यंत पोहोचलं.
पूर्वी जेव्हा लेखनकला म्हणजे कागद, शाई, प्रिंटींग ह्या सगळ्या गोष्टी अस्तित्वात नव्हत्या, तेव्हा मौखिक परंपरेने आयुर्वेद एका पिढीकडून पुढल्या पिढीकडे पोचला. म्हणजे गुरु शिष्यांना जे काही शिकवीत, ती प्रत्येक गोष्ट शिष्य अक्षरश: तोंडपाठ करायचे आणि मग ते इतरांना शिकवायचे. नंतर जेव्हा लेखनकलेचा शोध लागला, तेव्हा वेगवेगळ्या वनस्पतींच्या पानांवर, झाडाच्या खोडांच्या सालीवर (बार्क) ह्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या जाऊ लागल्या. ह्यातूनच आयुर्वेदाचे अनेक ग्रंथ निर्माण झाले, जे आजही प्रमाण मानले जातात. आजही आपल्याला काही म्युझियम्समध्ये पूर्वीचे काही वेगवेगळ्या विषयावरचे हस्तलिखित ग्रंथ पहायला मिळतात. आज कॉम्प्युटरचं एक बटन क्लिक केल्यावर आपल्याला हवी ती माहिती मिळते, तेव्हा नुसता विचार करून बघा की तेव्हा अशा प्रकारे हस्तलिखित निर्माण करायला, किती वेळ लागत असेल आणि किती श्रम घ्यावे लागत असतील.
वैद्यकशास्त्र शिकणा-यांना गुरुचे महत्त्व काय आणि किती असते, हे वेगळं सांगायची गरजच नाही आणि वैद्यकशास्त्र शिकणारे जेव्हा प्रॅक्टीस करायला लागतात, तेव्हा त्यांना परमात्म्याचं-सद्‍गुरुंचं महत्त्व अगदी प्रत्येक क्षणाला अनुभवाला येतं. "आय ट्रीट ही क्युअर्स’ ही गोष्ट वैद्यकशास्त्रात प्रसिद्धच आहे. मी स्वत:च्या प्रॅक्टीसमध्ये अनेक वेळा ह्याचा अनुभव घेतलेला आहे. श्रद्धावान ह्याला त्याच्या सद्‍गुरुंचा त्याला आलेला अनुभव म्हणतो. ह्या अनुभवामागे त्याचा त्याच्या सद्‍गुरुंवर असणारा विश्वास, श्रद्धा ह्या सगळ्या गोष्टी असतातच.
अध्यात्मामध्ये अनेक वेळा कर्म-कर्मफ़ळ हा शब्द ऐकण्यात येतो. आयुर्वेदही कर्माचा एक महत्त्वाचा सिद्धांत सांगतो की मनुष्याने केलेलं कुठलंही लहानात लहान कर्म का असेना, प्रत्येकाला त्याचं फ़ळ भोगावंच लागतं. झोपणं, बोलणं, खाणं, येणं, जाणं, बसणं अगदी विचार करणं हेदेखील कर्मामध्येच अंतर्भूत होतं आणि काहीही न करणं हेदेखील एक कर्मच आहे. कर्माविषयी सर्वांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत बापूंनी म्हणजेच सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी श्रीमद्‍पुरुषार्थ ग्रंथराजात अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे.
म्हणजे आपली कुठलीही क्रिया ही कर्माच्या अंतर्गत जर येते तर आपल्या आजारी पडण्याचाही कर्माच्याशी काही तरी संबंध असलाच पाहिजे. नाही का?

Monday, February 28, 2011

अनिरुध्दाज्‌ इंस्टिट्यूट ऑफ ग्रामीण विकास





ग्रामीण विकास योजनेतील वनराई बंधार्‍याबाबत स्वप्निलसिंह यांना मार्गदर्शन करताना परमपूज्य सदगुरु श्रीअनिरुध्द बापू


पशूपालना विषयी स्वप्निलसिंह यांना मार्गदर्शन करताना परमपूज्य सदगुरु श्रीअनिरुध्द बापू
सेंद्रीय शेती सुपीक माती ! पर्यावरण-र्‍हासाची नाही भीती !!
थेंबे थेंबे तळे साचे, स्वप्न होई पूर्ण ग्रामीण विकासाचे
फळबाग योजनाविषयक चर्चा करताना परमपूज्य सदगुरु श्रीअनिरुध्द बापू व परमपूज्य सुचितदादा
"वात्सल्याची शुध्द मूर्ती, नंदाई काळजी वाही"

परसबाग फुलवूया, ग्राम-विकास घडवूया !


परमपूज्य सदगुरु श्रीअनिरुध्द बापूंच्या मार्गदर्शनानुसार श्री. स्वप्निलसिंह यांनी ग्रामीण विकास योजनेच्या कार्याची सुरुवात गोविद्यापीठम येथे केली आहे. त्याची ही एक झलक.


























Friday, January 28, 2011

ऋतुचर्या

 २८-०१-२०११

ऋतुचर्या


खूप थंडी पडलेली असताना लिहिलेल्या पोस्टनंतर खूपच दिवसांनी ही पुढली पोस्ट. आता ब-याच ठिकाणी ब-यापैकी उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे. 
क्लायमेट चेंज झाल्यानंतर घडणारी पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजारांची सुरुवात. आता थंडी संपून उन्हाळा सुरू झाल्यावर सर्दी, खोकला यासारखे आजार डोक वर काढायला लागतात आणि ह्या रोगांच कारण आपल्याला माहीत असतंच, क्लायमेटमध्ये झालेला बदल आणि प्रत्येक वेळी असे क्लायमेटमध्ये बदल झाले की असे छॊटे मोठे आजार डोक वर काढतातच.
मग आज ह्याविषयीच थोड काही, अर्थातच आयुर्वेदाचा व्ह्यू. आपण संपूर्ण वर्षात तीन प्रकारच्या क्लायमेटचा अनुभव घेतो, उन्हाळा,पावसाळा आणि थंडी. अर्थात संपूर्ण जगात प्रत्येक ठिकाणी ह्याचं प्रमाण डिफ़र होतं. आयुर्वेद ह्यातीन प्रकारच्या क्लायमेटला सहा ऋतुंमध्ये डिव्हाइड केलेलं आहे. हे सहा ऋतु- शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद आणि हेमंत.  हेमंत ऋतुत थंडीची सुरुवात होते आणि शिशिरात चांगलीच थंडी असते, वसंतात उन्हाळ्याची सुरुवात होते आणि ग्रीष्मात हा उन्हाळा खूप कडक होतो, वर्षा म्हणजे पावसाळा, शरदात पाऊस संपून पुन्हा एकदा उष्णता जाणवायला लागते म्हणजे ऑक्टोबर हिट. 
भारतीय कालगणनेनुसार सपूर्ण वर्षात १२ महिने असतात. जसे सध्या आपण जानेवारी ते डिसेंबर हे बारा महिने मानतो. ह्या १२ महिन्यातल्या प्रत्येक दोन महिन्यात मिळून एक ऋतु असं गणित असतं. म्हणजे आयुर्वेद काळात अशी कालगणना असायची. आता सगळ्या जगातच जानेवारी ते डिसेंबर असे बारा महिने असल्यामुळे आज काल ऋतु त्यानुसार डिव्हाइड केले जातात. 
प्रत्येक ऋतु मध्ये विशिष्ट क्लायमेट असतं आणि त्यानुसार मग आपल्याला आपलं बिहेवियर ठेवायला लागतं म्हणजे ज्या ऋतुत जसं क्लायमेट तसं आपलं जेवण इ. आयुर्वेदाने कोणत्या ऋतुत काय खायचं काय खायचं नाही, काय करायचं काय करायचं नाही ह्याचा पूर्ण विचार केलेला आहे आणि त्याला ऋतुचर्या असं नाव दिलेलं आहे. एकूण सहा ऋतुंच्या सहा ऋतुचर्या. मग ह्यामध्ये काय खायचं काय नाही इथपासून ते कोणत्या प्रकारचे कपडे घालायचे हे सगळं सांगितलेलं आहे. फ़ॉर एक्झाम्पल शिशिर ऋतुमध्ये थंडीचं प्रमाण खूप जास्त असतं मग अशावेळी लोकरीचे जाड कपडे घालणं आवश्यक आहे. तर उन्हाळ्यात कॉटनचे कपडे घालायचे. ऋतुचर्येतला महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या ऋतुत कोणत्या दोषाचा प्रकोप होतो आणि का होतो, हे सविस्तर सांगितलेलं आहे आणि मग त्यावर काय उपाय करायचे ते देखील सांगितलेलं आहे. जसं आता थंडी संपून उन्हाळा सुरू झाला की सर्दी , खोकला होतो कारण जसा उष्णतेने बर्फ़ वितळतो तसाच बाहेरच्या उष्णतेमुळे थंडीत शरीरात अ‍ॅक्युम्युलेट झालेला कफ़ पातळ होतो आणि सर्दी, खोकला ह्यांची सुरुवात होते, तसचं पावसाळ्यात शरीरात पित्त अ‍ॅक्युम्युलेट होतं आणि ते शरद ऋतुतल्या उष्णतेने शरीरात वेगवेगळे रोग उत्पन्न करू शकतं त्याचप्रमाणे उन्हाळ्यात शरीरात वात अ‍ॅक्युम्युलेट होतो आनि तो त्यानंतर येणा-या पावसाळ्यात वाताचे वेगवेगळे डिसीजेस उत्पन्न करू शकतो. 
अर्थात ह्या क्रिया जरी नॅचरल असल्या तरी त्यावरचा उपायही आयुर्वेदा सांगतो कारण शेवटी आयुर्वेदाला माणसाची हेल्थ चांगली ठेवायची आहे. म्हणूनच ह्यावरचा पहिला उपाय आयुर्वेदाने सांगितला आहे,तो म्हणजे एक ऋतु बदलून जेव्हा दुसरा सुरू होणार असतो तेव्हा जाणा-या ऋतुचा शेवटचा आठवडा आणि येणा-या ऋतुचा पहिला आठवडा, ज्याला ऋतुसंधि म्हटलं जातं, त्यात आधी आपण जे सगळे जेवणाचे, वागण्याचे रुल्स फ़ॉलो करतो ते हळूहळू सोडून द्यायचे आणि हळूहळू नव्या येणा-या ऋतुच्या जेवण्या-वागण्यासंबंधीच्या रुल्सना फ़ॉलो करायचं. ह्यामुळे जरी शरीरात वर सांगितल्याप्रमाणे नॅचरल चेंजेस घडले म्हणजे शरीरातले दोष विशिएट झाले तरी ते कंटोलमध्ये राहतील आणि डिसीज उत्पन्न करू शकणार नाहीत. दुसरा आयुर्वेदाचा उपाय म्हणजे विशिष्ट ऋतुत विशिष्ट पंचकर्म कणं. आजकाल पंचकर्म हा शब्द ब-याच जणांना ऐकून माहीत आहे. ह्या पंचकर्माविषयी पुढे कधीतरी सविस्तर बोलूया.       
ह्यात आणखी एक महत्त्वाची इन्फ़र्मेशन द्यायची म्हणजे कुठल्या ऋतुत कुठलं पाणी प्यायचं, तेही ऋतुचर्येत सांगितलेलं आहे. शरद ऋतुत अगस्ती नावाच्या ता-याचा उदय होतो आणि त्यावेळी सगळ्या पॉन्डस, लेक्स मधल पाणी निर्विष होतं असं आयुर्वेदात वर्णन येतं, त्याला त्यांनी हंसोदक असं नाव दिलेलं आहे. कारण हंस नेहमी फ़क्त शुद्ध पाणीच पितो, असं सांगितलं जातं आणि म्हणूनच शुद्ध पाण्याला त्याकाळी हंसोदक ही उपमा दिली जात असावी. आज काल आपल्याला प्युरिफ़ाइड पाणी सहज मिळतं त्यामुळे आपल्याला त्या काळातल हे पाण्याविषयीचं वर्णन वाचून आश्चर्य वाटेल.  
आता सध्या काही दिवसांपूर्वीच संक्रांत होऊन गेली. खर तर संक्रांत म्हणजे संक्रमण. ह्या वेळी सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. त्यामुळे आता भारतात दिवस हळूहळू मोठा व्हायला सुरुवात होते. ह्या वेळी संक्रांतीच्या वेळी असंख्य स्त्रियांनी बापूंनी रामराज्याच्या प्रवचनात सांगितल्याप्रमाणे "श्रीमंगलचण्डिकानैमित्तिकप्रपत्ती’’ केली. ह्याचा मुख्य उद्देश्य बापूंनी सांगितला होता की "ही प्रपत्ती करणारी स्त्री तिच्या कुटुंबाची रक्षणकर्ती सैनिक बनते”. ह्याविषयी बापूंनी आणखी जे काही सांगितलेलं आहे, ते मूळातून वाचण्यासारखं आहे. पण ह्यावरून आपल्या मुख्य ही गोष्ट लक्षात येईल की ही प्रपत्ती करणारी स्त्री स्वत:तर सबल बनतेच आणि इतकी सबल बनते की तिच्यामध्ये तिच्या पूर्ण कुटुंबाचं रक्षण करण्याची कपॅसिटी येते. रियली अमेझिंग. कारण रक्षण करायला फ़िजिकल आणि मेंटल दोन्ही प्रकारची स्ट्रेंथ लागते आणि ही प्रपत्ती केल्याने अर्थातच ती मिळते. रामराज्याच्या प्रवचनात बापूंनी पुरुषांसाठी श्रावणातल्या सोमवारी "श्रीरणचण्डिकानैमित्तिकप्रपत्ती” सांगितली होती, जी अर्थातच मागच्या वर्षी श्रावण महिन्यात पुरुषांनी केलीही. 
सध्याचा काळ बघितला तर रोजच्या लाइफ़मध्येच आपण एवढ्या स्ट्रेस आणि स्ट्रेन्सना सामोरे जात असतो की अशा वेळी आपल्याला फ़िजिकल आणि मेंटल दोन्ही प्रकारच्या स्ट्रेन्थच महत्त्व आणि गरज लक्षात येते आणि माणसाने कितीही एफ़र्टस केले तरी ह्या दोन्ही स्ट्रेन्थ एकाच वेळी आणि प्रत्येकासाठी उचित तेवढ्या प्रमाणात केवळ सद्‍गुरुच देऊ शकतात.