Wednesday, April 27, 2011

अनादि अनन्त आयुर्वेद

२७-०४-२०११



अनादि अनन्त आयुर्वेद

आयुर्वेद आपल्या भारतातलं सगळ्यात प्राचीन वैद्यकशास्त्र. खरं तरं आयुर्वेद हा कुणी लिहिलेला नाही. तो कसा अस्तित्वात आला, त्याविषयी आयुर्वेदात अगदी सुरुवातीलाच सांगितलं जातं. आयुर्वेद शिकणा-या स्टुडन्टसना अगदी सुरुवातीलाच ह्याची माहिती करून दिली जाते.
आयुर्वेद कुणाही मनुष्याने लिहिलेला नाही. तो जेव्हा मानवी जीवन अस्तित्वात आले, त्याच्या आधीपासूनच अस्तित्वात होता. म्हणून आयुर्वेदाला अनादि, अनंत असं म्हटलं जातं. अनादि-म्हणजे जो कधी लिहिला गेला किंवा कधी निर्माण झाला हे कोणीही सांगू शकत नाही, अनंत-म्हणजे कुठल्या एका पॉईंटला आता आयुर्वेदाचे नॉलेज संपलं असं होतच नाही. खरं तर प्रत्येक माणूस हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो. कारण ह्या जगात आपल्याला शिकण्यासाठी प्रत्येक क्षणाला काही ना काही तरी असतंच. आयुर्वेद हा ब्रह्मा, प्रजापति, अश्विनीकुमार आणि इंद्र ह्यांच्याकडून आयुर्वेदाच्या आचार्यांकडे आला आणि त्यांच्याकडून मग गुरु-शिष्य परंपरेने आयुर्वेदाचं नॉलेज इतरांपर्यंत पोहोचलं.
पूर्वी जेव्हा लेखनकला म्हणजे कागद, शाई, प्रिंटींग ह्या सगळ्या गोष्टी अस्तित्वात नव्हत्या, तेव्हा मौखिक परंपरेने आयुर्वेद एका पिढीकडून पुढल्या पिढीकडे पोचला. म्हणजे गुरु शिष्यांना जे काही शिकवीत, ती प्रत्येक गोष्ट शिष्य अक्षरश: तोंडपाठ करायचे आणि मग ते इतरांना शिकवायचे. नंतर जेव्हा लेखनकलेचा शोध लागला, तेव्हा वेगवेगळ्या वनस्पतींच्या पानांवर, झाडाच्या खोडांच्या सालीवर (बार्क) ह्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या जाऊ लागल्या. ह्यातूनच आयुर्वेदाचे अनेक ग्रंथ निर्माण झाले, जे आजही प्रमाण मानले जातात. आजही आपल्याला काही म्युझियम्समध्ये पूर्वीचे काही वेगवेगळ्या विषयावरचे हस्तलिखित ग्रंथ पहायला मिळतात. आज कॉम्प्युटरचं एक बटन क्लिक केल्यावर आपल्याला हवी ती माहिती मिळते, तेव्हा नुसता विचार करून बघा की तेव्हा अशा प्रकारे हस्तलिखित निर्माण करायला, किती वेळ लागत असेल आणि किती श्रम घ्यावे लागत असतील.
वैद्यकशास्त्र शिकणा-यांना गुरुचे महत्त्व काय आणि किती असते, हे वेगळं सांगायची गरजच नाही आणि वैद्यकशास्त्र शिकणारे जेव्हा प्रॅक्टीस करायला लागतात, तेव्हा त्यांना परमात्म्याचं-सद्‍गुरुंचं महत्त्व अगदी प्रत्येक क्षणाला अनुभवाला येतं. "आय ट्रीट ही क्युअर्स’ ही गोष्ट वैद्यकशास्त्रात प्रसिद्धच आहे. मी स्वत:च्या प्रॅक्टीसमध्ये अनेक वेळा ह्याचा अनुभव घेतलेला आहे. श्रद्धावान ह्याला त्याच्या सद्‍गुरुंचा त्याला आलेला अनुभव म्हणतो. ह्या अनुभवामागे त्याचा त्याच्या सद्‍गुरुंवर असणारा विश्वास, श्रद्धा ह्या सगळ्या गोष्टी असतातच.
अध्यात्मामध्ये अनेक वेळा कर्म-कर्मफ़ळ हा शब्द ऐकण्यात येतो. आयुर्वेदही कर्माचा एक महत्त्वाचा सिद्धांत सांगतो की मनुष्याने केलेलं कुठलंही लहानात लहान कर्म का असेना, प्रत्येकाला त्याचं फ़ळ भोगावंच लागतं. झोपणं, बोलणं, खाणं, येणं, जाणं, बसणं अगदी विचार करणं हेदेखील कर्मामध्येच अंतर्भूत होतं आणि काहीही न करणं हेदेखील एक कर्मच आहे. कर्माविषयी सर्वांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत बापूंनी म्हणजेच सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी श्रीमद्‍पुरुषार्थ ग्रंथराजात अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे.
म्हणजे आपली कुठलीही क्रिया ही कर्माच्या अंतर्गत जर येते तर आपल्या आजारी पडण्याचाही कर्माच्याशी काही तरी संबंध असलाच पाहिजे. नाही का?