Friday, December 24, 2010

आहार

ॐ                   आहार                                           २४-१२-२०१०
सगळीकडेच खूप मस्त थंडी पडलीय़ॆ. अशा थंडीत साहजिकपणेच काही तरी स्पाईसी खावंसं वाटतं, नाही का? स्पाईसी खायचं म्हणजे त्यात स्पाईसेस असणारचं आणि स्पाईसेस म्हणजे आपले मसाल्याचे पदार्थ जे भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग असतात. अगदी भाजीच्या फ़ोडणीपासून ह्या मसाल्यांच्या वापराची सुरुवात होते. साधी आपली मोहरी, हळद आणि हिंग हे फ़ोडणीचे तीन बेसिक घटक मसाल्याच्याच पदार्थातले आहेत आणि मसाले म्हणजे तिखट, चटपटीत, जेवणाला चव देणारे अशी आपल्याला त्यांची साधारण ओळख असते पण आयुर्वेद ह्या पदार्थांचे औषधी गुणधर्म सांगतो. वास्तविक त्यांचा रोजच्या जेवणात वापर करण्यामागे महत्त्वाची संकल्पना अशी असावी की रोजच्या रोज थोड्याशा प्रमाणात त्यांचे गुण जेवणातून पोटात जावेत. सगळ्याच मसाल्याच्या पदार्थांचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ते ज्या पदार्थात घातले जातात त्याची चव वाढवतात. मसाल्याच्या पदार्थांचा दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे ते काही प्रमाणात अन्नपचनालाही मदत करतात. पण जवळ जवळ सगळेच मसाल्याचे पदार्थ हे गरम-ऊष्ण, तिखट असतात, त्यामुळे ज्यांना पित्ताचा त्रास असतो किंवा इतरांनीही ते जपूनच वापरले पाहिजेत आणि खरं सांगायचं तर कुठल्याही पदार्थात प्रमाणापेक्शा जास्त मसाले पडले तर त्याची चवच बिघडते. आता स्पाईसेस यादीतल्या नेहमीची मंडळींची ही थोडी ओळख- मोहरी-सरसों(मस्टर्ड), हळद(टर्मरिक), हिंग(असॆफ़ोटीडा) हे प्रत्येक फ़ोडणीचा बेस ह्याशिवाय तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरी, जावित्री, आलं,लसूण,ओवा,वेलची-छोटी आणि मोठी, जावित्री, जायफ़ळ, मिरची इ.
हे सगळे जरी मसाल्याचे पदार्थ ह्या कॅटेगरीत मोडणारे असले तरी प्रत्येकाची स्वत:ची वेगळी प्रॉपर्टी आहे.
हळद, सगळ्यात बेस्ट ब्लड प्युरीफ़ायर. भारतात लग्नाच्या आदल्या दिवशी वधू-वरांना हळद लावण्याची प्रथा आहे.  हळद जशी इंटर्नली घेता येते तशी ती एक्सर्टनली सुद्धा वापरता येते. ब्लड प्युरिफ़ायर असल्यामुळे ती त्वचेचा रंग उजळण्याचं काम करते. हळदीची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती अ‍ॅटीसेप्टीकचं कामही खूप मस्त करते आणि जखमेतलं रक्त थांबविण्याचं कामही करते. त्यामुळे कुठेही खरचटलं किंवा छोटीशी जखम झाली आणि रक्त यायला लागलं की पहिली हळद त्यावर लावली जायची. त्यामुळे रक्त थांबायचं, जखम भरायची आणि कुठलंही इन्फ़ेक्शन देखील होत नसे. हिंग हा गॅसेस वर सगळ्यात चांगला समजला जातो. पूर्वी लहान मुलांना गॅस होऊन पोट जर फ़ुगलं तर पाण्यात हिंग मिक्स करून तो पोटावर लावला जायचा. अगदी मोठ्या माणसांनाही गॅसेस झाले तर ते जेवणाच्या शेवटी ताकाबरोबर हिंग घ्यायचे. गॅसेसमुळे होणार्या पोटदुखीवर ओवा सगळ्यात बेस्ट औषध. हे सगळे मसाल्याचे पदार्थ म्हणजे हळद, मोहरी इ. ड्राय़ वापरले जातात. पण आलं(जिंजर), लसूण(गार्लिक) ह्यासारखे पदार्थ वेट-ओले-फ़्रेश वापरले जातात. हळद कधी कधी ओलीही वापरली जाते पण त्याचं लोणचं इ. करून. आलं हे पचन-डायजेशन अतिशय चांगलं करणार आहे आणि हेच आलं सुकवून त्याच्यापासून जी सुंठ बनवली जाते ती तर अनेक रोगांवर रामबाण इलाज. म्हणजे जर आलं मिळाल नाही तरी सुंठीचा पर्याय कधीही मिळू शकणारा. 
महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या मसाल्याच्या पदार्थांची झाड असतात. ह्यातलं आलं, हळद आणि लसूण हे पदार्थ जमिनीखाली मिळतात. थंडीच्या दिवसात लसूण तिच्या पानांसकट मिळते, पातीच्या कांद्यासारखी. काळीमिरी वेलावर लागते. तमालपत्र म्हणजे एका विशिष्ट झाडाची पानं-लिव्हज, दालचिनी म्हणजे त्याच झाडाची साल-बार्क.वेलची अगदी छोट्याशा झाडावर लागते. जायफ़ळ मोठ्या झाडाला लागतं आणि  जायफ़ळावर जी साल असते तिला जावित्री म्हणतात, तर लवंग म्हणजे  झाडाची कळी-बड, हिंग म्हणजे  झाडाच्या स्टेममधून बाहेर पडणारा एक प्रकारचा गोंद-रेझीन. मोहरीची झाडंही छॊटी असतात. सरसों नावाचा मोहरीसारखाच पदार्थ असतो आणि ह्या सरसोंच्या पानांची भाजी केली जाते त्याला  सरसों का साग म्हणतात. 
आता शेवटी थोडं महत्त्वाचं. ह्या थंडीच्या सीझनमध्ये वातावरणात खूप ड्रायनेस असतो त्यामुळे ह्या काळात शरीरातला ड्रायनेस वाढविणारे पदार्थ खाऊ नयेत. आहारातली कडधान्य शरीरात ड्रायनेस वाढवतात, म्हणून त्यांचा वापर टाळावा. "श्रीवर्धमान व्रताधिराज”च्या नऊ अंगांपैकी एक अंग आहारासंबंधी आहे आणि त्यात आहाराबद्दल विशेषरूपाने सांगण्यात आलेलं आहे. ह्या सीझनमध्ये तिळाचं तेल सगळ्यात बेस्ट- खाण्यासाठी आणि शरीरावर लावण्यासाठीही. आज आपण अनेक प्रकारची तेल वापरतो पण आयुर्वेदात वर्णन येतं की जे तिळापासून काढलं जातं त्यालाचं "तेल’’-ऑईल म्हणतात. तिळाच तेल सगळ्या प्रकारच्या तेलांमध्ये स्निग्ध आहे. थंडीतल्या ड्रायनेसवर सगळ्यात चांगला उपाय. "श्रीवर्धमान व्रताधिराज”चं एक अंग तिळाच्या तेलाच्या वापराविषयी आहे. अर्थात उपासना हे ह्या व्रताचं अविभाज्य अंग आहे. त्यामुळे "श्रीवर्धमान व्रताधिराज” म्हणजे माणसांच्या मेंटल आणि फ़िजिकल दोन्ही प्रकारच्या हेल्थची सर्वोत्तम काळजी घेणारं. 
सो, आजसाठी एवढंच. आता बहुतेक आपली भेट न्यू इयरमध्येच. सो, हॅपी न्यू इयर टू ऑल इन अ‍ॅडवान्स.

Tuesday, December 7, 2010

मन

ॐ 
७-१२-२०१० 

मन
रविवारी घरात आवराआवरी करताना अचानकपणे जुने फ़ोटो सापडले. अगदी कॉलेजच्या काळापासूनचे. कॉलेजच्या आय.डी कार्डवर लावलेलेही, घरातल्या वेगवेगळ्या समारंभांचे. सॉलिड मजा वाटली ते फ़ोटो बघताना आणि त्यातल्या ब-याचश्या फ़ोटोतले प्रसंग, ती स्थळ, वेगवेगळी माणसं अगदी काल परवा पाहिल्यासारखी आठवली. खूपच गंमत वाटली आणि स्वत:च्या मेमरीची पण मजा वाटली. कधी कधी १०-१५मिनिटांपूर्वी घडलेली एखादी गोष्ट लक्षात राहत नाही आणि ते फ़ोटो बघितल्यानंतर त्यातली किती तरी ठिकाण अगदी कालच बघितली असावीत अशी स्पष्ट आठवली. मलाच माझी मोठी गंमत वाटली आणि परत एकदा मानवी मनाची ताकद प्रत्ययाला आली. आपण मागच्याच पोस्टमध्ये मनाबद्दल बोललो होतो. खरच माणसाचं मन कसं आहे हे आपल्याला कळायला खूप अवघड आहे. आपण आपल्या घरात बसून मनाने जगात कुठेही फ़िरून येऊ शकतो, आहे की नाही ग्रेट गोष्ट. जे कधी घडू शकणार नाही अशी कल्पनाचित्र पण आपलं मनच रंगवत असतं. मनाने एका क्षणात भूतकाळात जातो आणि तितक्याच सहजपणे आपलं मन आपल्याला भविष्याची स्वप्नही दाखवतं.
म्हटलं तर मनाची ताकद किती सॊलिड आहे नाही का? म्हणूनच ती आपल्याला योग्य दिशेने वापरता यायला हवी. कारण मन जेवढे चांगले विचार करतं तेवढेच वाईट विचारही करू शकतं आणि करतंही. म्हणूनच मराठीत म्हटल जातं की मन चिंती ते वैरी न चिंती. म्हणजे आपलं स्वत:च मन जितक्या टोकाचा वाईट विचार स्वत:साठी करू शकतं तितका कदाचित आपला एखादा शत्रुही करणार नाही.
तर आज परत एकदा मनाचंच पुराण. आज मनाविषयी दुसरा महत्त्वाचा मुद्दा. शास्त्रात म्हटलं आहे की मन हे अन्नमय असतं. आपण मागेच म्हटलं की मन डोळ्यांनी दिसत नाही पण त्याचं काम तर दिसतं मग जसं शरीराचं पोषण होतं तर मग शरीरातल्या ह्या अवयवाचं पोषण होतं असणारचं. मनाचं पोषणही शरीराप्रमाणेच आपण जे काही खातो, त्यापासूनच होतं.  म्हणूनच मग सात्त्विक अन्न खा, असं आपल्याला सांगितलं जातं. आज काल नेमकं काय खायचं हा प्रश्न हा ब-याच जणांना पडलेला असतो. त्यातून मग वेगवेगळी पुस्तकं, इन्फ़र्मेशन देणारी मटेरियल्स वाचली जातात, जी आहाराशी संबंधित असतात.
ह्या संदर्भात एक गोष्ट आठवली. फ़ार पूर्वीच्या काळी एक मोठे अध्यात्मातले अधिकारी व्यक्ती होते. पूर्णपणे संन्यस्त जीवन जगणारे. कशाचाही मोह, राग, लोभ, खेद नसणारे. ते एका गावात एका घरी जेवायला गेले आणि जेवल्यानंतर त्यांच्या मनात चक्क चोरीचे विचार यायला लागले. अशक्यप्राय अशा ह्या घटनेचा त्यांनी शोध घेतला तेव्हा त्यांना असं कळलं की त्यांना जेवण घालणार्या व्यक्तीने त्याचा सगळा पैसा चोरीमारी करून मिळवला होता आणि आता त्यातून श्रीमंत होऊन तो दानधर्म करत होता. अर्थातच त्या संन्यस्त व्यक्तिमत्त्वाला ह्या अन्नातून जे काही दोष लागायचे ते लागलेचं कारण त्यांच मनच इतकं निर्मळ झालेलं होतं की अनुचित मार्गाने मिळवलेल्या पैशाने तयार केलं गेलेलं अन्न खाताच त्यांच्या मनावर परिणाम होऊन कधी मनाला शिवलेही नसतील असे चोरीचे विचार त्यांच्या मनात यायला लागले. तात्पर्य, माणूस जे काही खातो त्याचा त्याच्या मनावर परिणाम हा होतोच. म्हणूनच मग ज्या दिवशी बराच वेळ जप करायचा असतो अशा वेळी मन चंचल करणार्या कांदा, लसूण ह्यासारख्या गोष्टी खाऊ नयेत म्हणून सांगितल जातं. कांदा आणि लसूण दोन्ही गोष्टी मनाला  चंचल करतात त्यामुळे जपात मन स्थिर होऊ शकत नाही.
आता तरी परत प्रश्न राहिलाच की काय खायचं आणि काय खायचं नाही हा. हा प्रश्न श्रीमद्‍पुरुषार्थ ग्रंथराजाने अगदी सजपणे सोडवलेला आहे. सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी लिहिलेल्या ह्या ग्रंथात त्यांनी आहारातल्या कोणत्या अन्नपदार्थाचे काय गुण आहेत ते सांगितलेले आहेत आणि त्यावरून कोणीही सहजपणे काय खायचं आणि काय नाही ह्याचा निर्णय घेऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रंथराज तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, ह्याचा निर्णय कसा करायचा थोडक्यात स्वत:च व्यक्तिमत्व ओळखायला मदत करतो आणि आपलं व्यक्तिमत्व सगळ्यात बेस्ट व्हावं म्हणून आहार, विहार इ. त काय बदल करायचे ते सांगतो.
कारण जोपर्यंत आपल्या मनात बदल घडत नाही तोपर्यंत आपली प्रगती नाही. कारण शास्त्रातचं सांगितलेलं आहे की मानवाच्या पुन्हा पुन्हा जन्म घेण्याला किंवा मुक्तीला मनच कारणीभूत असतं.