Friday, October 22, 2010

वैद्यानां शारदि माता

22-10-2010
वैद्यानां शारदि माता।

जीवेत्‌शरद: शतम्‌। अशा प्रकारे एखाद्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचे अभिष्टचिंतन (त्याला विश करण्याची) करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. ह्याचा अर्थ त्या व्यक्तीने 100 शरद ऋतु पहावेत थोडक्यात उसकी उमर बहुत लंबी हो. परवाच याचा रेफरन्स कोणाला तरी हवा होता, त्यावेळी अचानक ह्या ओळीची आठवण झाली आणि त्याच बरोबर ही वर लिहिलेली दुसरी ओळही आठवली.
खरं तर ह्या वर लिहिलेल्या ओळीचा अर्थ असा आहे की शरद ऋतु हा वैद्यांसाठी म्हणजेच डॉक्टरांसाठी आईसारखा आहे. आयुर्वेदात डॉक्टसर्र्ना वैद्य असं म्हटल जात. आयुर्वेदाला जेव्हा ऍडमिशन घेतली तेव्हा कॉलेजमध्ये टिचर्सच्या नावापुढे वैद्य किंवा वैद्या असं लिहिलेय असायचं आणि आपल्याला जेव्हा डीग"ी मिळेल तेव्हा आपल्याही नावापुढे अशीच डीग"ी लागेल ह्याचा आनंद व्हायचा. तर वैद्यांसाठी म्हणजेच डॉक्टर्ससाठी हा शरद ऋतु फार फायद्याचा आहे असं म्हटलं जातं. त्याचं पहिलं कारण म्हणजे त्या वेळी बरेच आजार एकदम डोकं वर काढतात कारण सिंपल वातावरणातला बदल. पावसाळा संपून एकदम ऑक्टोबर हिट सुरू होते. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या काळात वैद्यांना भरपूर औषधी वनस्पती मिळायच्या. कारण पावसाळ्यात अनेक वनस्पती उगवायच्या आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यातल्या काही वनस्पती अगदी थोेड्या दिवसांसाठीच जिवंत रहायच्या आणि नंतर नष्ट व्हायच्या. एक उदाहरण सांगायच तर एक भुई आवळा नावाची वनस्पती असते, जी अगदी थोड्या दिवसांसाठीच उगवते आणि नंतर नष्ट होते, ही वनस्पती अगदी छोटीशी असते. अजूनही कधी तरी रस्त्याच्या कडेला ही वनस्पती सापडते. आपण च्यवनप्राशचं नाव ऐकलच असेल. त्यातला महत्त्वाचा इनग"ेडीयन्ट असतो आवळा. पण ह्या भुई आवळा आणि च्यवनप्राशमध्ये वापरला जाणारा आवळा हे दोन्ही वेगवेगळे आहेत. आपल्याकड जनरलीे दोन प्रकारचे आवळे मिळतात. एक छोटे जे जनरली चिंचा, बोरांच्या गाड्यांवर मिळतात, हे खूपच आंबट असतात. च्यवनप्राशसाठी मोठे आवळे वापरले जातात, जे खाल्यावर पाणी प्यायलं की एकदम गोड चव लागते. तर हे जे आवळ्याच झाड असतं ते ह्या ऋतुत वाढायला लागतं म्हणजे इतका वेळ असतं कुठे, असं तुम्हाला वाटेल, पण जेव्हा उन्हाळ्याचा सीझन सुरू होतो म्हणजे एप्रिल-मे तेव्हा हे झाड डॉर्मन्ट स्टेजमध्ये जातं म्हणजे अक्षरश: भूमिगत होत म्हणजे त्याची पानं, फुलं, फळं काहीच जमिनीवर दिसत नाही, फक्त त्याचं मूळ तेवढं जमिनीत राहतं आणि पाऊस पडून गेल्यावर परत एकदा त्याला पान फुटून ते जमिनीवर वाढायला लागतं. तर सांगायचा मुद्दा हा की पावसाळा संपल्यावर अशा असं"य वनस्पती अगदी थोड्या काळासाठी उगवतात. मग त्यांच कलेक्शन ह्याच काळात करून ठेवावं लागतं आणि मग त्यापासून औषध बनवून किंवा सुकवून ठेवून त्या वर्षभर म्हणजे पुन्हा त्यांचा सीझन येईपर्यंत वापराव्या लागतात. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे पूर्वी हे जे वैद्य म्हणजे आयुर्वेदाचे डॉक्टर्स होते ते स्वत: जाऊन ही औषधं तोडून आणायचे, स्वत: त्यापासून वेगवेगळी औषध बनवायचे आणि पेशंटला द्यायचे. आज काल केमिस्टच्या दुकानात गेलं की लगेचच कुठलंही औषध आपल्याला मिळतं आणि समजा एखादं औषध आपल्याला मिळालं नाही तर आपल्याला अगदी चुकचुकल्यासारखं होत. मग पूर्वीच्या काळी जेव्हा औषध सगळ्यात आधी जाऊन शोधून आणा म्हणजे पहिल्यांदा ते औषध म्हणजे ती वनस्पती ओळखता यायला हवी, कारण एक सार"या दिसणाऱ्या अनेक वनस्पती असतात किंवा एकाच वनस्पतीचे अनेक टाइप्सही असतात फॉर एक्झाम्पल काही काही वनस्पतीचे लाल फुल येणारी, निळी फुलं येणारी, पांढरी फुलं येणारी असे प्रकार असतात आणि आपण जेव्हा वनस्पती तोडायला जाणार तेव्हा त्याला फुलं आलेली नसतील तर मग त्यातून आपल्याला हवी तीच वनस्पती तोडून आणायची  हे खूपच कठीण काम. मग ती आणून त्याच्यापासून औषध बनवायची आणि ती प्रिझर्व करून ठेवायची. विचार केला तर हे खूपच कठीण काम. पण हे सगळं केलं जायचं आणि शिष्यांनाही शिकवलं जायचं. अजूनही आयुर्वेदात वनस्पतींपासून औषधं बनवली जातात, पण आज काल बऱ्याच ठिकाणी  त्यासाठी स्पेशली ह्या वनस्पतींची लागवड केली जाते.
आयुर्वेदात आम्हाला आत्मा, मन, पंचमहाभूतं अशा वेगवेगळ्या संकल्पना अगदी फर्स्ट इयरलाच अभ्यासाला असायच्या. तेव्हा आम्हाला वाटायचं की डॉक्टर होण्याचा आणि ह्याचा काय संबंध? पण आता मला कळतय की डॉक्टरांना ह्या संकल्पना स्पष्ट झाल्या तर त्यांना प्रॅक्टीसमध्ये खूप फायदा होतो आणि जेव्हा एका जिवंत माणसाची ट्रीटमेंट केली जाते आणि जीवन-मरण अशा गोष्टीशी संबंध येतो, तेव्हा खरंच सद्‌गुरु-भगवंताचं महत्त्व आपोआप कळतं. सो, नेक्स्ट टाइम, लेट्‌स टॉक समथिंग अबाऊट मन, आत्मा इत्यादि.          

Saturday, October 9, 2010

अंक दुसरा


अंक दुसरा     9-9-2010 शनिवार
     नवरात्रीच्या सुरुवातीला सर्वप्रथम आदिमातेच्या स्मरणाने सुरुवात करूया. नमश्चण्डिकायै।
सप्टेंबर महिन्यात ब्लॉग सुरू केल्यानंतर फक्त एक पोस्ट लिहिली आणि त्यानंतर मध्ये बराच मोठा पिरीयड गेला. पण सगळ्यात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या एका नव्या माध्यमातून सगळ्यांशी जोडलं जाण्याचा आनंद. आज काल प्रत्येकासाठी वेळ ही अतिशय महत्त्वाची गोष्ट झालेली आहे, त्यामुळे एकमेकांशी संवाद साधायची इच्छा असूनही ते साधत नाही. त्यामुळे ब्लॉगसारख्या माध्यमामुळे आता ही गोष्ट सोपी झालेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांनी दिलेल्या रिस्पॉन्समुळे लिहिण्याचा उत्साह खरोखरच वाढला.
आता दुसरी पोस्ट ब्लॉगवर टाकायला उशीर झाला कारण, कारणही तसंच महत्त्वाचं होतं. साईनिवासमध्ये शूटिंग चाललेलं होतं आणि त्यात बिझी असल्यामुळे दुसरी पोस्ट फारच उशिराने लिहिली गेली.
     सगळ्यात आधी साईनिवास म्हणजे नेमकं काय, ते कुठे आहे, ह्याची थोडक्यात कल्पना द्यावीशी वाटते. साईनिवास म्हणजे साईबाबाचं चरित्र ज्यांनी लिहिलं, त्या हेमाडपंतांचं म्हणजेच श्री. गोविंद रघुनाथ दाभोलकरांचं घर. आता तिथे त्यांचे नातू आणि त्यांची फॅमिली असे सगळे जण राहतात. थोडक्यात हेमाडपंतांची 3-4 आणि 5वी पिढी आज ह्या घरात राहते आहे.
     ज्यांनी शूटिंग बघितलेलं आहे किंवा शूटिंगचा अनुभव घेतलेला आहे, त्यांना पडद्यावर दिसणाऱ्या सिरीयल्स, जाहिराती किंवा पिक्चर्स मागच्या श्रमांची पूर्ण कल्पना आणि जाणीव असतेच. अक्षरश: एकेका प्रसंगामागे अनेक लोकांची मेहनत असते,वेळ असतो आणि ही गोष्ट मी स्वत: अनुभवली. पण बाकी एकंदरीत शूटिंग वॉज ग्रेट एक्सपिरीयन्स.
खरं तर साईनिवासबद्दल पूर्वी काहीच माहिती नव्हती. पण एक दिवस अचानक साईनिवासबद्दल माहिती मिळाली, तिथे जाणं झालं आणि तिथूनच खरं तर आयुष्याला कलाटणी मिळाली असं म्हणायला हरकत नाही. कारण इथेच सगळ्यात आधी बापुंविषयी, त्यांच्या कार्याविषयी माहिती मिळाली. बापु म्हणजे डॉक्टर अनिरुद्ध धैर्यधर जोशी. माझे सद्गुरु. हे स्वत: एम.डी.(मेडीसीन) आहेत. मागच्या ब्लॉगमध्ये "अनिरुद्धाज ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट'चा उल्लेख केला होता. ही संस्था डिझास्टरशी संबंधित गोष्टींचं प्रशिक्षण देणारी संस्था आहे. ही संस्था आणि अशा अनेक संस्था आज बापुंच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत आहेत. ज्याविषयी आपण पुढे कधीतरी सविस्तर बोलूच.
शूटिंगच्या दरम्यान एक गोष्ट ठळकपणे जाणवली की आजच्या काळात टेक्नॉलॉजी किती प्रगत झाली आहे. प्रत्येक सेक्टरसाठी ही प्रगत टेक्नॉलॉजी खूपच फायद्याची ठरत आहे. अगदी आयुर्वेदासारख्या प्राचीनतम म्हणून गणल्या जाणाऱ्या वैद्यकशास्त्रानेही आज कॉम्प्युटरसारख्या टेक्नॉलॉजीशी दोस्ती केलेली आहे. पूर्वीच्या काळी गुरु-शिष्य परंपरेने आयुर्वेद शिकवला जायचा आणि  आयुर्वेदाचं ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवले जाई. नंतर ते ग्रंथस्वरूपात म्हणजेच लिखित स्वरूपात उपलब्ध व्हायला लागलं. आज आपण आयुर्वेदाची औषध फक्त माणसांसाठी वापरली जात असल्याची पाहतो; पण एक काळ असा होता की हत्ती, घोडे ह्यांच्यासारखे प्राणी आणि वनस्पती म्हणजे झाडांनाही आयुर्वेदाची औषध दिली जायची. वाचून कदाचित आश्चर्य वाटलं असेल पण त्या काळी हत्तींसाठी म्हणून हस्ति-आयुर्वेद, झाडांसाठी वृक्ष-आयुर्वेद आणि घोड्यांसाठी अश्व-आयुर्वेद अशा वेगवेगळ्या ब्रान्चेस होत्या. आज हे ज्ञान उपलब्ध आहे किंवा नाही आणि वापरलं जात आहे किंवा नाही, हे काही माहित नाही.
आयुर्वेद हे वैद्यकशास्त्र मला खरचं ग्रेट वाटतं. मी स्वत: आयुर्वेद शिकले किंवा त्यातली औषध वापरली म्हणून नव्हे तर आयुर्वेदातल्या डॉक्टर्सचा म्हणजे जे खरं तर त्या काळातले ऋषी, आचार्य . होते,त्यांचा रिसर्च बघितला तर त्यांच्या अथक परिश्रमांची कल्पना येते. जेव्हा इलेक्ट्रीसिटीही नव्हती तेव्हा आयुर्वेदातले सुश्रुत नावाचे आचार्य सर्जरी-ऑपरेशन्स करायचे. त्यांच्या ग्रंथामध्ये कॅटरॅक्ट-मोतीबिंदू, नाक, ओठ, कान ह्यांच्या सर्जरी कशा करायच्या ह्याचं वर्णन मिळतं, तसंच आज वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी जशी वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट्स्वापरली जातात, तशी त्या काळातल्या इन्स्ट्रुमेंट्स्ची ही माहिती ह्या सुश्रुतांनी त्यांच्या ग्रंथात दिली आहे. त्यांच्या स्टुडंटस्ना ते सर्जरी शिकवायला वेगवेगळे मातीचे पुतळे, चिंध्यांनी तयार केलेले माणसांचे पुतळे अशा अनेक गोष्टी वापरायचे. इज इट नॉट अमेझिंग?
आयुर्वेदात अशा बऱ्याच अमेझिंग गोष्टी आहेत आणि त्या सगळ्यांशी शेअर करायला मला नक्कीच आवडेल. तर मग आज ह्याच नोट वर निरोप घेऊ या.